जि.प.स्वनिधीमधुन हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, व किडणी रोपन रुग्णास आर्थिक मदत केली जाते.
१) हृदय शस्त्रक्रियारु.१०,०००/-
२) किडणी रोपन रु.१०,०००/-
३) कॅन्सर उपचार रु.७,०००/-
केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार ही योजना प्राथमिक शाळांतील इ. १ली ते इ ५ वी तील मुलांना शासन निर्णय क्र. मुप्राशा १०९५/ २१३४ / प्राशि / २ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दि. २२/११/९५ नुसार व शासन निर्णय क्र. १००२/१२७५/०२ प्राशि – ४ मंत्रालय विस्तार भवन, दि. १६ मे २००२ नुसार सुरु झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील इ. १ली ते इ ५ वी मध्ये शिकणाऱ्या जि.प.शाळेतील न.पा., म.न.पा. तसेच अनुदानित / अंशतः अनुदानित खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. वरीलप्रमाणे योजनेचे स्वरूप आहे.
शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई क्र. मुप्राशा १०९५/ २१३४ / प्राशि / २ दि. २२/११/१९९५ प्रमाणे
या योजनेअंतर्गत हालाखीची आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण मध्येच सोडाव्या लागणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जिल्हा स्तरावर सावित्रीबाई फुले दत्तक मुलीस तिचे इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत दर महा रु.३०/- देण्यात येतील
जे दत्तक पालक दत्तक मुलीच्या शिक्षणसाठी अर्थसहाय्य करू इच्छितात त्यांनी दरमहा रु. ३०/- अशी रक्कम परस्पर सदर मुलीला तिचे इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण होई पर्यंत द्यावे व तिला शाळेत टिकून राहण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावे. जे पालक परस्पर अर्थसहाय्य करू इच्छितात त्यांनी जिल्हास्तरावरील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना निधी मध्ये आपला निधी जमा करू शकतात. ( दरमहा रु. ३०/- किंवा वार्षिक रु.३००/- अथवा रु. ३०००/- एकदाच आठ वर्षासाठी देणगी म्हणून देता येईल.)
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुला मुलींच्या पट नोंदणी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना तसेच जिल्ह्यातील एक विस्तार अधिकारी शिक्षण यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षिस दिले जाते.
शाळेमध्ये मुलींची उत्कृष्ट पट नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरची योजना ही जि.प. शाळेतील शिक्षकांसाठी आहे.
सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.
मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी व १०३ विकास गटातील ( गगनबावडा व शाहुवाडी ) सर्व विद्यार्थी पात्र ठरतात.
सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.